Friday, February 3, 2012

राकेश पांगारे


राकेश पांगारे

आयुष्यात काही माणसे सतत समाज जीवन फुलवण्या साठी जगतात,कविता  करतात ,बोधप्रद लिहितात .आणि व्यवसाय करता करता परमार्थही साधतात ,मिळालेला मानवी जन्म हा इदं मम म्हणत  कार्यरत राहतात ,"स्वताःच्या आयुष्यातला सुगंध वाटत वाटत दुसरयाचे आयुष्य हि सुगंधी करतात,

व्यवसायांनी बांधकाम व्यावसाईक असूनही तुकोबांच्या आदेश प्रमाणे "उत्तम व्हावाहारे jjजोडोनिया धन "ह्या संत वचनाशी बांधिलकी ठेऊन घर बांधतो आणि आपल्या  चोख व्यवहाराचा एक आदर्श (कफ परेड चा नव्हे)उभा करतो,देशांतर करता करता  आपली आणि    आपल्या  छाया चित्र कारीतेची ओळखही "ह्या नव नयन महोत्सवा"पद्धतीने करवतो

एखाद्या पैलूदार हियावर पडल्रले प्रकाशकिरण जसा तो लक्ष पटीनेपरावर्तीत करतो तसा हा मानवी हिरा आहे ,संपन्न आणि सुशिक्षित युवकाचे एक बहु आयामी चित्र ,संपन्नता फक्त धन्राशितच मोजली जात नाही आणि सुशिक्षण  फक्त  पदाव्यावरती अवलंबून नसते त्याची  मोजमाप वेगळीच असतात ,हि बहु आयामी प्रगलभता असुनही तरला पारदर्शी शब्दांची मनमोहक अतिश बाजी करता करता विचारांचे धनही प्रदान करतो .राकेशाचे साहित्य तरुणाईला पडलेले एक सत्यांशी स्वप्नच.