Saturday, January 21, 2012

prasad ganpule

चिरंजीव प्रसाद,
तुझे उत्तर मीळाले धन्यवाद,तुझ्या बद्दल जे काही मी लिहिले आहे ते मला वाटले ते नव्हे तर जे खरे आहे ते लिहिले आहे
निसंशय तुझी सामाजिक कार्याची तळमळ आणि त्याला मिळालेला एक सहृदय चेहरा हे खरोखर नक्षत्रांचे देणे आहे
तुझ्या गुणांचे केलेले कौतुक हे एक तळ्यात पडलेल्या चांदण्या प्रमाणे आहे ,हे तेज तुझ्या गुणांचे आहे माझ्या शब्दांचे नाही
समाजाचे देणे देण्याची हि निर्मल आणि अंगीभूत तळमळ ,हा एक ईश्वरीय प्रसादाच आहे ,तुझे गुण मोठे की माझे गुण वर्णन मोठे
हा प्रश्न्न विष्णू मोठा की विष्णुसहस्त्रनाम मोठे एवढे सोपे आहे आणि उत्तर तुलाही माहित आहे ,तू जे काही कार्य करतोस त्याचे
मूल्यमापन तू करू शकत नाहीस कारण तू ते काम मनातल्या तळमळीने तू करतोस,पोच पावती साठी नाही पण त्याचे मूल्यमापन करून
योग्य ती पोच पावती देणे हे हि एक सामाजिक कर्तव्यच आहे कमीतकमी आम्हाला तेवढे तरी पार पडू दे.
शशांक रांगणेकर

Tuesday, January 17, 2012

chinmay

चिरंजीव चिन्मय.

,म.टा.चा उपसंपादक झाल्याबद्दल ,हार्दिक अभिनंदन ,वृत्तपत्र आणि बातमीदार इतिहास घडवतात हे मराठी वृत्तपत्र सृष्टीला नवीन नाही ,महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडण घडणीत वृत्तपत्रांचा फार मोठा वाटा आहे संदेशकार अच्युत राव कोल्हटकर पासून मराठा .प्र के अत्र्या पर्यंत ,अनेकांनी मोठे योगदान करून अक्षरशः मराठी मनाला घडवले आहे
तुझ्यात कुठेतरी ती निर्भीडता दिसते ,का केव्हा आणि कशी ह्याचे समर्पक उत्तर नाही कदाचित हि हार्दिक इच्छा असावी,बाळशास्त्री जांभेकर यांचे पुण्य स्मरण कर भटक्याची भ्रमंती आठव आणि कामाला सुरवात कर,शुभास्ते पंथः सन्तु .
शशांक रांगणेकर

LikeUnlike · · Share