प्रिय जनहो,
काय चालले आहे माझ्या महाराष्ट्रात,हो त्याच महाराष्ट्रात,ज्या महाराष्ट्राच्या मातीने अभिजना पासून बहुजना पर्यंत पसाय दान आणले,ज्या मातीने जातीपातीचा पगडा झुगारून देऊन "नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस "म्हणत जाती भेदांच्या थडग्यावर संताची मांदियाळी सजवली ,कर्म दरिद्री कार्माठाना "भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी काठी हाणू,असा ठ न ठ णित इशारा दिला त्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीत , काय चालले आहे ? ,"बहु जन हिताय बहु जन सुखाय ,शहसुनो शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते "असे बिरूद अभिमानाने मिरवणाऱ्या शिवरायाच्या महाराष्ट्राची माती ,"शिवरायाचे आठवावे रुप ,शिवरायाचे आठवावे स्वरूप "असे सांगणारी आणि समर्थ चिया सेवका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे "असे अभिमाने विचारणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या महाराष्ट्राची माती आजही सुजलाम सुफलाम आहे भक्ती आणि ज्ञानाच्या गोदागंगा अजूनही इथे वाहताहेत, तरीही आदर्शाचे ताबूत का नाचताहेत,तेल्या ताम्बोल्याचे पुढारी पण अभिमानाने मिरवणाऱ्या गीता रहस्यकार लोकमान्याच्या कर्मभूमीत राजकीय स्वार्थासाठी इतिहास पुसणाऱ्या काही महाभागांना भविष्यकाळ सोडाच वर्तमानही माफ करणार नाही.नियतीने जगाच्या राजकारणात भारत भूमीवर ,भारताच्या राजकारणात महाराष्ट्रावर आणिमहाराष्ट्राच्या राजकारणात पुण्या नगरीवर एक नैतिक आणि सामाजिक नेतृत्व चिन्हाकित केलेले आहे आणि त्याची साक्ष इतिहासच देईल. विसरू नकात "महाराष्ट्र राज्य विना राष्ट्र गाडा ना चाले,"
शशांक t..
December 31, 2010Shashank Ranganekar
maharashtraरिय जनहो,,
गुरु वसिष्ठ हे थोर विद्वान ऋषी होते,आणि त्यांची पत्नी अरुंधती हि हि एक मोठी प्रज्ञावंत तत्वावेत्ती होती,
तिने ब्राम्हणाची फार सुंदर व्याख्या केली आहे ,"यः ब्रम्हा जानाति सहा ब्राह्मणः"जो ब्रम्हा जाणतो तोच
ब्राम्हण .जन्माने माणूस ब्राम्हण होत नाही कर्माने होतो हे आमच्या वैदिक तत्वज्ञानाचे सार आहे '
अपप्रवृत्ती समाजाच्या सर्व थरात असतात ,सद्गुण आणि दुर्गुण शी कोणत्याही जाती धर्माची बांधीलकी
असू शकत नाही ,माणूस जन्माने ब्राम्हण म्हणून जसा श्रेष्ट ठरत नाही तसा तो भ्रष्ट्र ठरात नाही ,जशी ती जातीयता
होती तशी हीही जातीयातच ठरेल,
इतिहासाने जसे कलुशी कब्जा बघितले तसे गणोजी शिर्केही बघितले,माझ्या प्रिय मित्रानो ह्या जाती पतीच्या उघड्या नागड्या शिवराळ राजकारणातून बाहेर पडा,तुमची नाळ ज्ञानेश्वर,तुकाराम ,शिव छत्रपती शिवरायाशी,समर्थ रामादासंशी,जोडलेली आहे,भूतकाळातल्या पापांसाठी वर्तमानातली डोकी उगाचच उडवू नकात,
"अखेर आपण सर्व मराठी आहोत ,"महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ,महाराष्ट्राविना
बाहेर पडा,तुमची नाळ ज्ञानेश्वर,तुकाराम ,शिव छत्रपती शिवरायाशी,समर्थ रामादासंशी,जोडलेली आहे,भूतकाळातल्या पापांसाठी वर्तमानातली डोकी उगाचच उडवू नकात,
"अखेर आपण सर्व मराठी आहोत ,"महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ,महाराष्ट्राविना राष्ट गाडा ना चाले"
शशांक
शशांक..
No comments:
Post a Comment