Thursday, July 21, 2011

VINANTI

आदरणीय बाळासाहेब ठाकरे,माननीय शरदचंद्र पवार,माननीय पृथ्वीराज चव्हाण,माननीय गोपिनाथाजी मुंडे,
आपण सर्वजण महाराष्ट्राचे नेते आहात ,आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा ठसा वेळोवेळी महाराष्ट्राच्या
राजकारणावर वर उमटलेला आहे.आपल्या सर्वांच्यातला एकाच सामान्य दुवा म्हणजे आपल्या सर्वांच्या रक्ताला मराठी
मातीचा गंध आहे ,मी एक सर्वसामान्य मराठी माणूस आहे राजकारण माझे क्षेत्र नाही ,मला एवढेच कळते की
आजतरी ह्या माझ्या सर्व मराठी नेत्यांनी राजकीय मतभेद विसरावेत आणि तुमच्या लाडक्या महाराष्ट्राच्या रक्षणार्थ
एकत्र यावे ,आणि जगाला दाखवून द्यावे की संकटाच्या समयी आम्ही शंभर आणि ते पाच नाहीत तर एकशे पाच
आहोत. सेनापती बापट सांगून गेले आहेत की"महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ,महाराष्त्रवीना राष्ट्र गाडा ना चाले .
ह्या चातुर्मासात हे एकीचे व्रत घ्या तुमच्या मराठी बाण्याला जागावा महाराष्ट्रच नाही तर देशही तुमचा ऋणी राहील .

No comments:

Post a Comment